समृध्दी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात : ग्रेडर मशीन कोसळून १५ मजुरांचा मृत्यू

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलीकडेच समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या कटू स्मृती विस्मृतीत जात नाही तोच मध्यरात्री ग्रेडर मशीन कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळ समृध्दी महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. सरळआंबा जवळील समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. यावेळी तयार झालेले सिमेंटचे पुलाचे भाग उचलणारे ग्रेडर मशीन कोसळले. त्याखाली अनेक कामगार दाबले गेले आहेत. यातील १५ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच समृध्दी महामार्गावर अपघातानंतर बस पेटून २५ प्रवासी ठार झाले होते. यानंतर आता हा अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी तेथे धाव घेऊन मृतदेह काढण्यासह जखमींना रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत केली.

Protected Content