हे तर आध्यात्माचे राजकारण ! : अमोल मिटकरी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सदगुरू परिवारातील सदस्यांच्या उष्माघाताने झालेल्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

 

अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत ११ जणांच्या मृत्यूला राज्य सरकराला जबाबदार धरत जोरदार टिका केली आहे. यात ते म्हणाले, आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची सुद्धा एक पद्धत होती. मात्र या सरकारने अध्यात्माचे राजकारण करत नाहक लोकांचा बळी घेतला आहे. त्यांच्या मृत्यूला शिंदे सरकार जबाबदार आहे. तसेच त्यांनी शिंदे सरकारविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली. ११ जणांच्या मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मागणी आता सद्गुरू परिवारानेही जोर लाऊन धरली पाहिजे, असे ते म्हणाले.

 

कालच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हजेरी लावलेल्या अकरा भाविकांचा मृत्यू झाल्याने आता राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

 

Protected Content