हणुमंतखेडे सिमच्या विद्यार्थिनीने बनविला शून्य ऊर्जेवर आधारित शितकक्ष

एरंडोल, प्रतिनिधी । तालुक्यातील हणुमंतखेडे सिम येथील कृषीकन्या ऐश्वर्या संजय पाटील हिने शेतकऱ्यांच्या मालाच्या साठवणुकीसाठी शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष बनविला आहे. तिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सध्याच्या वातावरणात प्रत्येकाने स्वतःला आधुनिक बनविणे काळाची गरज आहे. या गोष्टीला अनुसरून शेतकऱ्यांनी  देखील आधुनिक राहावे म्हणून ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत क. का. वाघ कृषी महाविदयालयातील विद्यार्थीनी तालुक्यातील हणुमंतखेडे सिम येथील कृषिकन्या ऐश्वर्या पाटील या विद्यार्थिनीने शितकक्ष बनविला आहे.  या शितकक्ष  शेतकऱ्यांनी पिकवलेला माल साठवून ठेवता यावा व चांगला भाव मिळेल त्या वेळेस विकता यावा यासाठी  बनविला आहे. शेतकऱ्यांचा पिकवलेला माल साठवण्यासाठी वीट, बांबू. पाईप, खाली पोती याचा वापर करून शितकक्ष निर्माण करण्यात आले आहे. या शिताकक्षाचे वातावरण बाहेरील वातावरण १० ते १५ सेल्सिअसने कमी असते म्हणून शेतकरी आपल्या मालाची साठवणूक जास्त वेळ करू शकतो. फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आद्रतेमध्ये केल्यास साठवण कालावधी वाढविणे शक्‍य आहे. शितकक्षात साठवणूकीमुळे शेतकऱ्यांनी पीकवलेला भाजीपाला फळे जास्त काळ टिकतात. या शितकक्षात कोणत्याही ऊर्जेचा वापर होत नाही  शितकक्षाची उभारणी कमी खर्चात व सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीषकुमार हाडोळे ,कार्यक्रम अधिकारी प्रा. परमेश्वरी पवार , प्रा. सुनील बैरागी व प्रा. निलेश गडगे यांचे मार्गदर्शन लाभले

Protected Content