सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय तपासाला बंदी

मुंबईः वृत्तसंस्था । ‘सीबीआय ही प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्याचा वापर राजकीय होत असल्याची चर्चा आहे, त्यामुळंच सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय राज्यात तपास करता येणार नाही,’ असं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रातील चौकशी करायची असल्यास त्यासाठी सीबीआयला आधी राज्य सरकारशी संपर्क साधावा लागणार आहे. राज्य सरकारची रितसर परवानगी मिळाल्यानंतरच सीबीआयला चौकशी करता येणार आहे. असा निर्णय गृहविभागानं घेतला आहे. सुशांत सिंह आत्महत्या, टीआरपी यामुळं हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

‘सीबीआयचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जातो, अशी चर्चा आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत उत्तर प्रदेशातही गुन्हा दाखल आहे. उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे देण्याचा प्रयत्न झाला असता. कोणीही सीबीआयचा राजकीय गैरफायदा घेऊ नये म्हणूनच सरकारनं हा निर्णय घेतला आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Protected Content