साखपुडा होण्यापुर्वीच तरूणाने उचलले टोकाचे पाऊल !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील देशमुख नगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने जानवे शिवारात असणाऱ्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. तरूणाचा उद्या साखरपुडा होता.

तेजस मनोहर मगर (वय-२८) रा. देशमुख नगर, अमळनेर असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस मगर हा शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी साखरपुड्याची तयारी म्हणून सलूनला जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र तेजस हा सलुन दुकानात न जाता थेट जानवे शिवारातील शेतात जावून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला असून त्याच्या वर दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मयत तेजसचे लग्न ठरले होते. रविवारी १३ नोव्हेंबर रोजी साखरपुडा होणार होता. मात्र साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तेजसने एवढी टोकाची भुमिका का घेतली? हे समजले नाही.

Protected Content