सरकार जनतेला घाबरू लागले ! : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी अटकाव केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टिका केली आहे.

 

अकोला ते नागपूर असे दहा दिवस पदयात्रा करत नागपूरपर्यंत आलेले आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी फडणवीसांच्या घरी भेट देण्याची परवानगी नाकारली होती. आज नागपूरच्या हद्दीबाहेरच पोलिसांनी त्यांना रोखले. कारवाईसाठी पोलीस आले असताना नितीन देशमुख हे जमिनीवर झोपले. अशा अवस्थेत पोलिसांनी त्यांचे हात पाय धरले आणि त्यांना उचलून नेलं.

 

नितीन देशमुखांना ताब्यात घेतल्यावर खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सरकारवर टीकास्र सोडलं आहे. “पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना अटक झाली. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी त्यांना रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी आक्रोश केल्याने अटका केल्या. महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली आहे. सरकार जनतेलाच घाबरु लागले!,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे

Protected Content