सरकार कधी पडणार हे ठाकरे यांना कळणारही नाही-आठवले

 

मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. पण, हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकार पडले तर अराजकता पसरेल असे विधान केले आहे. यावर आठवलं म्हणाले की, या विधानाशी मी सहमत नाही. सरकार स्वतःच पडेल आणि वेगळाच इतिहास घडेल, महाविकास आघाडी पराभूत ठरेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक दिवस भूकंप होईल, असे आठवले म्हणाले.

मुंबई पाकव्याप्त काश्मीरच्या कंगनाच्या भूमिकेचा आम्ही विरोधच केला. परंतु, मुंबईत तिला येऊ देणार नाही या घटनाविरोधी भूमिकेला विरोध दर्शवत त्याबाबत कंगनाला पाठिंबा दिला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर कंगना त्यांना भेटली असती तर ताबडतोब हा विषय मिटला असता. त्यामुळे कंगनाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन विषय संपवावा, असे आवाहनही आठवले यांनी केले.

Protected Content