सरकारचे अपयश झाकायचे असेल तेव्हा संजय राऊत लेख लिहून लक्ष वळवतात : फडणवीस

ठाणे (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असल्याचे अनेकदा म्हटले गेले. परंतू सरकारचे अपयश झाकायचे असेल तेव्हा संजय राऊत सरकार पाडण्याबाबत लेख लिहून लक्ष वळवतात, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली आहे.

 

यावेळी फडणवीस म्हणाले की, आपल्याला राज्यात सध्या सत्तेवर असणारे महाविकासआघाडी सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, असे म्हणत हे सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधामुळेच पडेल. सरकारचे अपयश झाकायचे असेल तेव्हा संजय राऊत सरकार पाडण्याबाबत लेख लिहून लक्ष वळवतात, असे म्हटले. पुढे ते म्हणाले की, राज्यातील एमएमआर क्षेत्रांचा दौरा केल्यानंतर या भागांमध्येच सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असल्याचे म्हणत अनुक्रमे ही आकडेवारी ६० आणि ७३ टक्के असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. शिवाय या भागांमध्ये समन्वय नसल्यामुळं चाचणीचे निकाल मिळण्यासही दिरंगाई होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

Protected Content