सत्य समोर येईल; राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर गृहमंत्री देशमुखांनी सोडलं मौन

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता सर्व आरोपांची चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे, ते समोर येईल” , असं गृहमंत्री देशमुख यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनीं आज रोखठोक सदरात मांडलेल्या भूमिकेवरून त्यांनी हे विधान केले आहे

 

“माजी पोलीस आयुक्तांनी माझ्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी, अशी  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. असेही ते म्हणाले .

Protected Content