सत्य बाहेर येण्याच्या भितीनेच एनआयएतर्फे तपास : शरद पवारांचा आरोप

sharad pawar new 696x447

मुंबई प्रतिनिधी । भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील सत्य बाहेर येईल या भीतीपोटी केंद्र सरकारने या प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपवला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

 

केंद्र सरकारने भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणांचा तपास एनआयएतर्फे करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शरद पवार यांनी टीका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईची फेरतपासणी होणे गरजेचे आहे असे पवार म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा राज्याचा अधिकार आहेत. राज्य सरकार या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करणार होते असेही पवार म्हणाले. ज्या अधिकार्‍यांनी खोटे गुन्हे दाखल करून निरपराध्यांविरोधात खटले दाखल केले त्याबाबतचे सत्य उघड होऊ नये यासाठीच केंद्र सरकारने हे प्रकरण आपल्या हाती घेतले असे आपल्याला वाटते असे पवार म्हणाले.

आपण राज्य सरकारला चौकशीची मागणी करणारे पत्र पाठवल्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर केंद्र सरकारने घाईघाईने हा तपास राज्य सरकारच्या हातातून काढून तो स्वत:कडे घेतला असे सांगत सरकारने असे घाईघाईत का केले असा प्रश्‍नदेखील पवार यांनी उपस्थित केला आहे.

Protected Content