संजय राऊत यांनी आता आपले नेतेदेखील बदलले : फडणविसांची टीका

औरंगाबाद प्रतिनिधी | दैनिक सामनातून संजय राऊत यांनी  केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांनी आता आपले नेते देखील बदलल्याचा टोला मारला आहे.

 

दैनिक सामनातील अग्रलेखातून आज  ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करतांना कॉंग्रेसची भलामण करण्यात आली आहे. याबाबत आज पत्रकारांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सामना आणि सामनाच्या संपादकाचे केद्र बिंदू बदलले आहेत. त्यांचे नेते अलिकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झाले आहेत. मला वाटतं तिच प्रचिती त्यांच्या अग्रलेखातून दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

एसटीचा संप मिटावा म्हणून विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहाकार्य केलं. आता सरकारने दोन पावलं पुढे यायला हवं. पण सरकार कामगारांसाठी दोन पावलं पुढं यायला तयार नाही. काल उपोषणकर्त्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याचं कळलं. मला वाटतं सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे. अजूनही वेळ गेली नाही. मेस्मा लागण्याआधी चर्चेतून मार्ग काढा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. तसेच नायर रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणावरूनही त्यांनी सरकारला फटकारले. या घटना सातत्याने घडत आहेत. पण त्यावर सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. दुर्देवाने नायरमध्ये कोणी बघायलाही गेले नाही. आमच्या नगरसेवक आणि आमदारांनी मुद्दा मांडल्यावर त्यांना जाग आली. सत्तेच्या अहंकारात एवढे मदमस्त झालेले राज्यकर्ते कधीच पाहिले नाही, जनता यांना कधीच माफ करणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

Protected Content