शेतकऱ्याने विष प्राषण करून संपविली जीवनयात्रा

शेंदुर्णी ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड (वय ४८) यांनी आपल्या शेतातील नापिकीला कंटाळुन  व वाढलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळुन शनिवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी विष प्राषण करून आत्महत्या केली.

 

छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील शेतकरी ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड आपल्या शेतातच दि.१८ नोव्हेंबर रोजी विष प्राषण केले. पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शनिवार दि.१९ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  अडीच एकर कोरडवाहु शेती असलेल्या आपल्या शेतात ते मेहनत करुन आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले,एक विवाहित मुलगी असा परिवार असुन त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.  त्यांच्या कुटुबीयांना शासकीय मदत त्वरीत मिळावी अशी मागणी होत आहे.

 

Protected Content