शिरसोली येथे शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे रवींद्र सखाराम खलसे (४७) या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली येथील रहिवाशी रवींद्र सखाराम खलसे (वय-४७ ) हे आज दुपारी ३ वाजता घरी एकटेच असतांना घरातील लाकडी सऱ्याला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी मुली शाळेमन आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. यावेळी शेजारच्यांनीर आणि पोलीस पाटील शरद पाटील यांनी धाव घेवून तत्काळ जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दरम्यान रविंद्र खलसे यांनी गळफास घेतल्याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Protected Content