शिरसोली येथे तरूणाची गळफास घेवून आत्महत्या; एमआयडीसी पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील बसस्थानकावरील  पानटपरी मालवाहू पिकअप वाहनाने जोरदार धडक देवून जमीनदोस्त केल्याच्या नैराश्येतून पानटपरी धारकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, १४ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजता भरधाव वेगाने येणारी ( एमएच २० ईएल ७५८१) क्रमांकाची मालवाहू पिकअपने  पुनमचंद श्रावण बारी(वय ४०) यांची मालकीची लक्ष्मी पानटपरीला धडकली होती. यात पानटपरी जमीनदोस्त झाल्यामुळे पानटपरी मालक पुनमचंद श्रावण बारी तणावात होते. पानटपरीची नुकसान भरपाई  देतो, असे मालवाहू पिकअप वाहन मालकाने पहिले सांगितले होते. नंतर दोन दिवसांनी मात्र पिकअप वाहन मालक नुकसान भरपाई  देत नाही असे सांगितल्यानंतर पुनमचंद बारी यांना प्रचंड तणावात आले. त्यांच्या उदरनिर्वाहाचे पानटपरी हेच एकमेव साधन होते. शेवटी  पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलीसात टपरीला धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. २० वर्षांपासून ज्या पानटपरीवर पुनमचंद बारी यांचा उदरनिर्वाह होता. ती पानटपरी आता जमीनदोस्त झाली व आपल्यावर असलेले कर्ज कसे चुकवावे या चिन्तेने बारी यांना नैराश्य आले होते. या नैराश्यातच बारी यांनी आज सकाळी  ७:३० वाजता राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोद करण्यात आली आहे. बारी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ भाऊ, १ बहिण, आई – वडील असा परिवार आहे.

Protected Content