विवाहितेला मारहाण करून पैशांसाठी छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरहून पैसे आणावे यासाठी विवाहितेला मारहाण व शारिरीक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अधिक माहिती अशी की, शहरातील आदर्श नगरातील माहेर असलेल्या विवाहिता गायत्री उर्फ रूपाली राहुल साळुंखे (वय-३०) यांच्या विवाह मुंबई येथील राहूल साहेबराव साळुंखे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती राहूल साळुंखे याने पैशांसाठी विवाहितेला मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पैसे आणले नाही म्हणून तिला पुन्हा शिवीगाळ व मारहाण केली. तर दीर, सासू, मावससासू यांनी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. बुधवारी २० जुलै रोजी विवाहितेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती राहूल साहेबराव साळुंखे, नंदा साहेबराव साळुंखे, प्रशांत साहेबराव साळुंखे, रा. जळगाव, दीर अमोल साहेबराव साळुखे, अमरावती, मावससासू विमल बळीराव चव्हाण रा. चोपडा, नणंद योगिता दिलीप पाटील, रा. सुरत, नणंद रिंगल नाना पाटील रा. मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

Protected Content