वाघूर धरणातून संध्याकाळी पाण्याच्या विसर्गात होणार वाढ

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज मंगळवार दि. २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी  वाघूर धरणातून  पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

 

वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. आज संध्याकाळी ५.३० वाजेपासून वाघूर धरणातून  पुर्वीचा ३४० क्युसेक व वाढीव ३४० क्युसेक्स असा एकुण ६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे. नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

Protected Content