रिधूर येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रिधुर येथील ३४ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला ठिबक नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, भिमराव सखाराम कोळी (वय-३४) रा. रिधुर ता.जि.जळगाव हे शेतकरी असून शेतीचे काम करतात. शेतात नेहमीप्रमाणे शेतात गेले. त्यांनी शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला ठिबक नळीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलीस पाटील प्रमोद निंबा पाटील यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content