रिक्शा पलटी होवुन भिषण अपघात ; एक ठार, दोन जखमी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनीधी  |  तालुक्यातील विरावली ते यावल रस्त्याच्या दरम्यान काल शुक्रवारी सायंकाळी ४  वाजेच्या सुमारास विरावली गावातून जळगाव जाणारी रिक्शा रस्त्याच्या बाजूस असलेल्या खड्ड्यात पलटी होवून तिघे गंभीर जखमी झालेत. तिघांना उपचारार्थ घेवून जात असताना एकाचा रस्त्याच दुर्दैवी अंत झाला.

 

 

विरावली ते यावल दरम्यान  रिक्षा ( क्र. एमएच १९ बीजे ८९४१)  ने  प्रवास करीत असतांना रिक्शा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजुस असलेल्या खड्ड्यात पडून पलटी होवुन झालेल्या भिषण अपघातात एक ठार तर दोन जणं गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान जखमींना उपचारासाठी प्रथम यावल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र यातील गंभीर जखमी दस्तगीर सबाज तडवी (रा. विरावली  ता.यावल ) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेवुन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राण ज्योत मालवली. ते हिंगोली जिल्हा येथे सेवेत कार्यरत असलेले आटीओ  आशिफ तडवी यांचे वडिल होत. दरम्यान सदर अपघातास कारणीभुत रिक्षा चालक हा अपघाताच्या स्थळावरून पसार झाला आहे.   याविषयी मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांकडुन संताप व्यक्त करण्यात येत असून सदर प्रकरणी चौकशी होऊन रिक्षा मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.

 

Protected Content