रिंगणगाव येथील तरूणाची नैराश्येतून रेल्वेखाली आत्महत्या

 

जळगाव प्रतिनिधी । बांभोरी येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरूणाचा जळगावात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील गजानन सुकलाल माळी (वय-३५) हा बांभोरी येथील साहित्या पेट्रोल पंपावर पंक्चर काढण्याचे दुकान आहे. जप्त केलेल्या चार चाकी गाडीचा आज लिलाव असल्याने त्यांनी मित्राला दुकान उघडण्यासाठी सांगून सकाळी घराबाहेर पडला आहे.  दुपारी १.३० वाजेच्या सुमारास शहरातील बजरंग रेल्वे पुलावर येवून गितांजली एक्सप्रेस खाली आत्महत्या केली. दरम्यान दोन महिन्यांपुर्वी त्याचा घटस्फोट झाला होता. नैराश्येतून त्याने ही आत्महत्या केल्याची नातेवाईकांकडून बोलले जात होते. त्याच्या पश्चात मुलगा, आई-वडील आणि एक भाऊ असा परीवार आहे.

Protected Content