रामलल्लाच्या कृपेने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झालाय : संजय राऊत

 

मुंबई (वृत्तसंस्था) रामलल्लाच्या कृपेने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. आम्ही रामलल्लाचा प्रसाद मिळाला असे मानतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी संवाद साधत होते.

महाविकास आघाडी सरकारला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत आल्यानंतर साडे तीन वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. त्यानंतर 4.30 वाजता रामलल्लांचे दर्शन घेतील. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, कॅबिनेटमधील काही मंत्री आणि शिवसेनेचे नेते असणार आहेत. तसेच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शरयू तिरावर आरती करणार नाहीत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. देशातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी रामलल्लाचे दर्शन घ्यावे अशी आमची इच्छा आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Protected Content