राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखविण्याची गरज : ठाकरेंचा घणाघात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असून यामुळे त्यांना कोल्हापुरी जोडा दाखविण्याची गरज असल्याची घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी मराठी माणसाच्या केलेल्या अपमानाचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. यावरून कोश्यारी यांनी आपला असे म्हणण्याचा हेतू नव्हता असे सांगून सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी यावरून आता सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा याची भगतसिंग कोश्यारी यांना जाणीव नक्कीच असेल. महाराष्ट्रात बरेच काही चांगले असले तरी आमच्याकडे कोल्हापुरी जोडा देखील असून कोश्यारी यांना हा जोडा दाखविण्याची वेळ आली आहे. कोश्यारी यांनी मुद्दाम हा प्रकार केला असून त्यांनी आधी देखील महाराष्ट्राचा अवमान केला आहे. मात्र आता त्यांनी कळस गाठला असून यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारागृहात पाठविण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

Protected Content