राजीनामा पुरेसा नाही, गुन्हा दाखल व्हावा- फडणवीस

 

 

मुंबई प्रतिनिधी । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा उशीरा आला असून तो पुरेसा नाही. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस व चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले की, राठोड यांनी पहिल्याच दिवशी राजीनामा देण्याची आवश्यकता होती. मात्र असे झाले नाही. यामुळे हा राजीनामा म्हणजे बुंदसे गयी वो हौदसे आती नही, या प्रकारातील आहे.

 

फडणवीस पुढे म्हणाले की, खूप उशीरा होऊनही राजीनामा आला असला तरी तो पुरेसा नाही. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

Protected Content