संपूर्ण तपास होऊन सत्य समोर यावे – राठोड

 

मुंबई : प्रतिनिधी । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माझ्यासह बंजारा समाजावर आरोप करण्यात आले असून चौकशी होऊन सत्य समोर यावे अशी अपेक्षा संजय राठोड यांनी केले. राजीनामा दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासोबत मंत्री अनिल परब व अनिल देसाई हे उपस्थित होते. राठोड म्हणाले की, मी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरूणी पूजा चव्हाण प्रकरणी अनेकांनी चिखलफेक केली. मला राजकीय व सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. म्हणून या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे. मी बाजूला होऊन खरे सत्य समोर यावे. यामुळे आपण राजीनामा दिल्याची माहिती राठोड यांनी दिली.

 

संजय राठोड पुढे म्हणाले की, पोलीस चौकशी करत असून सत्य जे काही असेल ते समोर येईलच. मात्र ज्या पध्दतीने राजकारण झाले…अधिवेशन चालू न देण्याची धमकी देण्यात आली ती चुकीचे आहे. हे संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

Protected Content