यावल-किनगाव रस्त्याची डागडुजी करा : प्रा. मुकेश येवले यांची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल ते किनगाव दरम्यानच्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केली आहे.

 

यावल ( प्रतिनिधी ) येथील शहराच्या प्रमुख मार्गावरून जाणार्‍या बुर्‍हाणपुर अंकलेश्वर या राज्य मार्गावरील यावल ते साकळी व साकळी ते किनगाव या दरम्यानच्या रस्त्याची ठीकठीकाणी पडलेल्या खड्डयामुळे अत्यंत बिकट अवस्था झाली असून , तात्काळ संबधीत विभागाने याकडे लक्ष वेधून रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी केली आहे .

 

या संदर्भात प्रा . मुकेश येवले यांनी म्हटले आहे की , यावल शहराशी जोडला गेलेला बु्र्‍हाणपुर ते अंकलेश्वर हा दोन प्रमुख राज्यांना जोडणारा मार्ग आहे. या मार्गावर मोठया प्रमाणावर वाहनांची वर्दळ दिसुन येते. अशा परिस्थितीत यावल ते साकळी व साकळी पासुन किनगाव पर्यंतच्या सुमारे १४ किलोमिटर रस्त्याची ठिकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने या मार्गावर झालेल्या भिषण अपघात होवुन अनेक निरपराध नागरीकांना आपले प्राण गमावले आहे.

अशा गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष न देणे हे नागरीकांचे दुदैव म्हणावे लागेल अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली , मागील अनेक दिवसापासुन या रस्त्याच्या दुरूस्ती करीता वाहनधारका पासुन तर विविध सामाजीक संस्था आणी सर्वसामान्य नागरीकांकडुन वारंवार मागणी करण्यात आलेली असतांना, स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन या नागरीकांच्या जिवन मरणाशी संबंधीत विषयाकडे गांभीयाने लक्ष देत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.  प्रशासना तात्काळ या मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती न केल्यास आपण राज्याचे विरोधी पक्षनेते ना.अजीत पवार यांना पत्राद्वारे सविस्तर माहिती देवुन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी सांगीतले.

Protected Content