मुंबई, पुण्याहून आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई व पुण्याहून जळगाव जिल्ह्यामध्ये परत आलेल्या व्यक्ती, नातेवाईक व विद्यार्थ्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तातडीने तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी अनेक रूग्ण हे पुणे, मुंबई परिसरातील असून सुरक्षितता म्हणून या भागातील अनेक नागरिक, विद्यार्थी व नातेवाईक आपल्या मूळगावी परत येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील ज्या व्यक्ती, विद्यार्थी, नातेवाईक मुंबई व पुण्यातून परत आपल्या मूळ गावी आले असतील व त्यांना कोरोना सदृश्यची लक्षणे आढळून येत असतील त्यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्यांच्यावर आवश्यक ते उपचार तातडीने करणे सोयीचे होईल. त्याचबरोबर अशा व्यक्तींमुळे त्यांच्या इतर नातेवाईकांना भविष्यात होणारा त्रास टाळणे सोयीचे होईल. तरी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्याकडे मुंबई व पुण्याहून आलेले कोणी नातेवाईक, विद्यार्थी यांना काही कोरोना सदृश्य लक्षणे जाणवत असतील तर त्यांची तातडीने तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content