जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे अनेक जणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. रोजगार गेल्याने, भाड्याला पैसे नसल्याने अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत सात ते आठ मोलमजुरी करणारे तरुण मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील मालवा येथे पायी निघाले आहेत.
मिलमध्ये काम करणारे हे तरुण आहेत. आर्थिक विवंचनेत सापडलेले तसेच गेल्या 3/4 महिन्यांचे वेतन न झाल्यामुळें तसेच उपासमारीची पाळी आल्याने ते तरुण आपल्या गावाकडे निघाले. गेल्या दोन तीन वर्षांपासून ते मोलमजुरी करणारे तरुण आशादायी जीवन जगत सुखी आयुष्याचे स्वप्न पाहत असतानाच कोरोना या महामारीच्या जखड्यात सापडले. मिल बंद व नोकर कपातीमुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली व नैराश्य आले. त्यामुळे ते पुन्हा गावाकडे परतले आहेत. कोरोनामुळे अत्यंत बिकट वेळ आमच्यावर आल्याचे त्यांनी प्रतिनिधीस सांगितले. जळगाव शहराच्या खेडी पुलाजवळ ते पायी जात असतानाच प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला.
https://www.facebook.com/watch/?v=299672478043115