महिला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने पटकाविला !

 

मेलबर्न, वृत्तसेवा । ऑस्ट्रेलियाने टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा दणदणीत पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली.

ऑस्ट्रेलियाच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली. शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या भरवशाच्या फलंदाजांनी दडपणाखाली अतिशय बेजबाबदार हवाई फटके खेळत आपल्या विकेट्स ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बहाल केल्या. त्यामुळे भारतीय संघाला हार पत्करावी लागली.

Protected Content