महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आ. अनिल पाटील यांचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करणारे भाजपा सरकारच्या निषेधार्थ  महाविकास आघाडीने उद्या सोमवार 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले या आंदोलनाला तालुक्यातील व्यापारी,  शेतकरी आणि दुकानदारांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

 

यासंदर्भात आ.पाटील यांनी आवाहन करताना म्हटले आहे की, लखीमपूर घटनेवरून राज्यातील व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या भावना तीव्र असून यामुळे सोमवार च्या बंदमध्ये येथील जनता निश्चिंतपणे सहभागी होईल. येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह आघाडीतील शिवसेना,काँग्रेस व इतर घटक पक्ष संपूर्ण ताकदीने बंद मध्ये उतरणार आहेत. लखीमपूरमध्ये ही संविधानाचीच हत्या झाली असून अन्नदाता शेतकऱ्यांना संपविण्याचे हे खडयंत्र आहे. त्यामुळे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि येथील जनता शेतकरी पाठिशीच आहे, हे आम्ही उद्या कळकळीत बंद पाळून दाखवून देऊ, असा दावा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. तर व्यापारी बांधवांसह जनतेने शेतकऱ्यांसाठी स्वयंस्फूर्तीने उद्याच्या बंद मध्ये सहभागी व्हावे अशी विनंतीही आमदारांनी केली आहे.

Protected Content