मविआ सरकारचा आणखी एक घोटाळा येणार समोर

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून दिलासा देताच डर्टी डझनवर कारवाई होत नाही तोवर लढा सुरूच राहणार असे म्हणत सोमय्या हे ट्वीट च्या माध्यमातून समोर आले. संपर्काच्या बाहेर असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो की उद्या ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा मी जनतेसमोर आणणार असल्याचे गुरुवारी माध्यमांसमोर सांगितले.

‘आयएनएस विक्रांत’ प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निधी जमा केला असून आर्थिक घोटाळ्याचे त्यांच्यावर आरोप प्रकरणी अटक होण्यापासून मुंबई न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. या काळात काही व्यक्तिंसाठी मी नॉट रिचेबल असेल, बाकी माझं काम मी व्यवस्थित करत होतो, उद्या त्याचा एक नमुना आपल्याला बघायला मिळेल. असे सांगत किरीट सोमय्या आज गुरुवारी १४ एप्रिल रोजी माध्यमांसमोर आले.

यावेळी सोमय्या यांनी मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो म्हणत राज्यातील ठाकरे सरकारला आणखी एक इशारा दिला असून,  डझनभर लोकांची संपत्ती घोटाळे प्रकरणात अटॅच झाली. कोर्टाने त्यावर रबर स्टँप लावला. जनतेचे पैसे लुटणारे हिंदुस्थानातले पहिलेच सरकार आहे’ असा आरोप किरीट सोमय्या यांनी करीत उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावे असेही म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याची (पाटणकर) संपत्ती, नवाब मलिक, संजय राऊत, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, यशवंत जाधव यांचाही संपत्ती जप्त होण्यात त्यात समावेश आहे. आणखी अनेकांची संपत्ती जप्त होणार आहे. यापाठोपाठ हसन मुश्रीफ, अनिल परब, सुजित पाटकर, सदानंद कदम यांचाही या घोटाळेबाजांमध्ये समावेश असल्याचे किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे.

Protected Content