मंदिरं खुली करण्यावरून अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई वृत्तसंस्था । मंदिरं खुली करण्यावरून अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.

मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लेटर वॉर सुरू आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

काल रात्री अमृता फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य केलं. ‘वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,’ अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

Protected Content