मुंबई (वृत्तसंस्था) अलहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्खननामध्ये तिथे बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. असे असतानाही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाकडून तथ्याच्या उलट निकाल दिला. भावनांच्या आधारावर राम मंदिर बांधण्याचा निर्णय देण्यात आला आहे. तथ्यांच्या आधारावर निर्णय झाला असता, तर जगाने संशय घेतला नसता. असे न केल्यामुळे जगभरात भारत व भारतीयांची प्रतिमा मलिन झाली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
राम मंदिर उभारणीच्या निर्णयावरून प्रकाश आंबेडकरांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, आज संपूर्ण जग भारतीयांना संशयाच्या नजरेने पाहत आहे. आपल्याला वाटत की, ते द्वेष करत आहेत. मात्र, सत्य परिस्थिती ही आहे की, येथील वैदिक धर्म मानणारे हे अन्य धर्मांवर अतिक्रमण करत आहेत. सध्या अयोध्येतही तेच होत आहे. इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांनीही म्हटलेले आहे की, अयोध्येत प्राचीन बौद्ध शिक्षा केंद्र आहे. असे ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.
आज पूरी दुनिया भारतीयों को शक की निगाह से देखती है।हमें लगता है वे द्वेष करते हैं,पर हकीकत ये है कि यहाँ के वैदिक धर्म माननेवाले अन्य धर्मों पर अतिक्रमण कर रहे हैं,जो अभी अयोध्या में हो रहा है।इतिहासकार राहुल सांकृत्यायन ने भी कहा था अयोध्या प्राचीन बौद्ध शिक्षा केंद्र साकेत है
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 4, 2020