भारत ससाणे यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

उदगीर, वृत्तसेवा | उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे दोन दिवशीय बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अखिल भारतीय साहित्य महामंडळाची दोन दिवशीय बैठक झाली. या बैठकीत साहित्य महामंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यात महामंडळाचे कार्यवाहक डॉ. दादा गोरे, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कोषाध्यक्ष डॉ.रामचंद्र काळूंखे , सदस्य मिलिंद जोशी, विलास मानेकर आदींचा समावेश होता. या संमेलनाच्या आयोजक संस्था सासणेंसाठी आग्रही होते. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ; तसंच संलग्न आणि समाविष्ट संस्थांनी सासणे यांच्या नावाला पसंती दिली आहे. लेखक भास्कर चंदनशिव, बाबा भांड, अच्युत गोडबोले आणि डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती.

Protected Content