भाजप शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । भाजपा शिष्टमंडळानं आज फोन टॅपिंगबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी हस्ताक्षेप करावा अशी मागणी केल्याचे  सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले

 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे असा यावेळी टोला लगावला.  काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही ते म्हणाले

 

काही आठवड्यांमध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या घटना चिंताजनक असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. “मुख्यमंत्र्यांचं मौन सर्वात चिंताजनक व . घातक आहे. शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला,” काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे व  इथले नेते वेगळं बोलतायत ,”  असे फडणवीस म्हणाले

 

मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे  बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, हे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा ही आमची मागणी असल्याचं व  १०० हून अधिक मुद्दे आम्ही राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे.

 

Protected Content