भगवान बुध्दांचा सेवेचा संदेश आजही महत्वाचा- पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भगवान बुध्दांनी जगाला सेवेचा संदेश दिला असून कोरोनाच्या प्रतिकारात सेवा हा महत्वाचा घटक असून तो आजही महत्वाचा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज बुध्द पौर्णिमेचे औचित्य साधून कोरोना वॉरियर्सच्या सन्मानाच्या कार्यक्रमाला संबोधित करतांना ते बोलत होते.

कोरोना विरूध्दच्या युध्दात मोलाची कामगिरी बजावणार्‍यांचा आज एका ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी याला ऑनलाईन संबोधित केले. याप्रसंगी ते म्हणाले की, भगवान बुद्धांनी जगाला सेवेचा संदेश दिला आहे. भगवान बुद्धांनी भारतीय परंपरा समृद्ध केली, ते स्वतःच आयुष्याचे दीप झाले आणि इतरांचं जीवनही प्रकाशमान केलं. भगवान बुद्धांचा संदेश आपल्या आयुष्यात निरंतर आहे, बुद्ध हे फक्त नाव नाही, तर प्रत्येक मानवाच्या हृदयात धडकणारा विचार आहे. भगवान बुद्ध यांनी सांगितलेले चार मार्ग दया, करुणा, समभाव, स्वीकार भारतभूमीसाठी प्रेरणादायी आहेत.

आज समाज व्यवस्था बदलली आहे, परंतु भगवान बुद्धाचा संदेश तोच आहे आणि आपल्या जीवनात याला एक विशेष स्थान आहे. आज देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लोक आपापल्या परीनं सेवा करीत आहे. आजारी लोकांवर उपचार करण्यापासून रस्त्यांवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक जण आपल्यासाठी सेवा देत आहे. आज जग अशांत आहे, अशा वेळी बुद्धांची शिकवण महत्त्वाची आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content