मुंबई प्रतिनिधी । राज्यात विधानपरिषद निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली असून यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पाठवले होते. २४ एप्रिल पासून राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त आहेत. तसंच उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती राज्यपाल यांनी निवडणुक आयोगाला केली होती. राज्यपालांच्या या विनंतीनंतर निवडणुक आयोगाने राज्यातील विधान परिषच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे.