ब्रेकिंग न्यूज : भारत-नेपाळ सीमेवर गोळीबार ; एक भारतीय नागरिकाचा मृत्यू, तिघे जखमी

सीतामढी (वृत्तसंस्था) बिहारमधील सीतामढी येथील भारत-नेपाळ सीमेवर आज नेपाळ पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबारा करण्यात आला. या गोळीबारात 4 भारतीय गंभीर जखमी झालेत. तर एकाचा व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

सीतामढीच्या सोनमर्सा सीमावर्ती भागातील जानकीनगर गावाजवळ आज नेपाळ पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात जखमी झालेल्यांपैकी चार जणांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक मिळालेल्या माहिती नुसार भारत-नेपाळ सीमेवर वाद झाला होता, त्यानंतर नेपाळ पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेनंतर सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. मागील काही दिवसांपासून भारत आणि नेपाळ (भारत-नेपाळ विवाद) सीमेबाबत वाद सुरु झाला आहे. नेपाळी संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केलाय, ज्यामध्ये भारताचे काही सीमाभाग नेपाळचे असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.

Protected Content