बोदवड पाणीपुरवठा संदर्भात तात्काळ उपाय योजना करा –पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड तालुक्यातील ५१ गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत अनेक तांत्रिक त्रुटी व अडचणी असल्याने तसेच हि योजना पुनरुज्जीवित करतांना भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा सारासार विचार न करता केवळ कागदावर हि योजना करून कंत्राटदाराच्या घशात घालण्याच्या दृष्टीने बनलेल्या या योजनेतून मात्र२८ गावांना कमी दाबाने तुरळक स्वरूपात पाणीपुरवठा सुरु असून २३ गावांना अद्यापही पाणी पुरवठा सुरु नसल्याची तक्रार आमदार श्री.चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे आलेल्या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर मंत्री पाटील यांनी आश्वासन दिल्यानुसार आज ४ जुलै २०२३ मंगळवार रोजी त्यांच्या मुंबई येथील दालनात बोदवड तालुका व शहर वासियांना मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी तात्काळ उपाय योजना करण्या संदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आमदारांनी लेखी पत्रात तक्रार केल्यानुसार, बोदवड तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणारी ५१ गावे पाणीपुरवठा योजना ही सन १९९५ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नावाने कार्यान्वित झाली. त्यावेळी या योजनेत प्रती माणसी ५५ ते ७० लि. पाणी देण्याची तरतूद करण्यात आली होती. यानंतर दि. १ जानेवारी २०१८ ला सदरील योजना पुनर्जीवित होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला परंतु या योजनेत भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा कुठलाही सारासार विचार न करता उलट पक्षी प्रती माणसी पाणी देण्याचे प्रमाण कमी करून प्रती माणसी ४० लि. पाणी देण्याची तरतूद करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा यांत्रिकी विभागात देखील अनेक त्रुटी आणि अडचणी ठेवून हि योजना तयार करतांना दिसून येते केवळ कागदावर निर्माण झालेली हि अपूर्ण योजना आज रोजी बोदवड वासियांची तहान भागविण्यास सपशेल अपयशी ठरलेली आहे.

तसेच ही योजना नव्याने करणे अपेक्षित असतांना सदरील योजना पुनर्जीवित करून योजनेची तत्कालीन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी घेऊन जाणारी पाईप लाईन ची क्षमता देखील कमी करून भविष्यातील लोकसंख्येचा विचार न करता आणि इतर असंख्य त्रुटी व अडचणी यांचा सारासार विचार न करता तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी लक्ष न दिल्याने संबंधित विभागाने तोडक्या स्वरूपाची योजना तयार करून कंत्राटदाराच्या घश्यात योजना घालण्याच्या हेतूने त्रुटी कायम ठेवून योजना पुनर्जीवित केलेली होती. हि योजना पुनर्जीवित करून योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण करून 5 वर्ष उलटूनही जि. प.ग्रामीण पुरवठा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेली नाही. तसेच आजतागायत ही योजना सक्षम रित्या कार्यान्वित नसल्याने आज रोजी बोदवड तालुका हा तहानलेला आहे.

तसेच सदरील योजना हाताळणारे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पत्रव्यवहारानुसार देखील खालील प्रमाणे त्रुटी योजनेत दिसून येत आहे. भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागामार्फत ८१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित योजनेचे काम झाले असून ५१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट ५१ गावांपैकी २८ गावांना पाणीपुरवठा चालू आहे. उर्वरित २३ गावांना अद्यापही पाणीपुरवठा सुरू नाही. सुरू असलेल्या २८ गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा रोटेशन पद्धतीने होत आहे. सदर योजनेतील पाईपलाईन वारंवार लिकेज होत आहे. त्यामुळे ५१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे. तसेच सदर काम डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये असल्याने सदर दुरुस्ती योजना कंत्राटदाराने करणे आवश्यक आहे. मात्र बऱ्याचदा संबंधित मक्तेदाराकडून दुरुस्तीचे काम व लिकेज काढण्याचे कामास टाळाटाळ होत आहे व विलंबाने होत आहे. असे मुद्देच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग , जिल्हा परिषद जळगाव यांनी उपविभागीय अभियंता , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग , भुसावळ यांना दिलेल्या पत्रात दिसून येत आहे.

त्यामुळे सदरील योजने संदर्भात तातडीने नव्याने उपाय योजना करून बोदवड तालुका वासियांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होणे संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे करण्यात आलेली होती. त्यानुसार आज दि.४ जुलै २०२३ रोजी मंत्रालय , मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात बोदवड तालुका व शहर वासियांना मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी तात्काळ उपाय योजना करण्या संदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत.

यावेळी बैठकित आमदार श्री.चंद्रकांत पाटील यांचे समवेत श्री.जैस्वाल, प्रधान सचिव(पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मुंबई ), श्री.अभिषेक कृष्णा, सदस्य सचिव(महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई), मुख्यकार्यकारी अधिकारी (जि.प.जळगाव), श्री.मोरे ,मुख्य अभियंता (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक), श्री,निकम ,अधीक्षक अभियंता (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जळगाव), श्री.गोळे,कार्यकारी अभियंता (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जळगाव), श्री.भोगावले ,कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु.जि.प.जळगाव , कक्ष अधिकारी डॉ.बऱ्हाटे आणि मंत्री महोदय स्वीय सहाय्यक अशोक पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी श्री.गणेश वडे ,श्री.प्रशांत पाटील यांचेसह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Protected Content