बिहार सरकारच्या भूमिकेला रिया चक्रवर्तीचा विरोध

नवी दिल्ली, वृत्तसेवा । मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवणं बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिली आहे. सर्वोच न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत सीबीआयने तपासा पासून दूर राहिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया रिया चक्रवर्तीने वकिलांमार्फेत दिली आहे. दरम्यान सीबीआयने तपास सुरु केला असून रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बिहार सरकारने सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी शिफारस केली होती. केंद्राने अधिकृत सूचना दिल्यानंतर सीबीआयने तपास हाती घेतला बिहार पोलीस जे तपासासाठी मुंबईत आले होते तेदेखील परतले आहेत. रिया चक्रवर्तीने सुशांतचा मृत्यू मुंबईत झाला असल्याने बिहार पोलीस नाही तर महाराष्ट्र पोलिसांनी तपास केला पाहिजे असा युक्तिवाद केला आहे. “बिहार सरकारने अख्त्यारित येत नसतानाही सीबीआयकडे तपास सोपवला आहे,” असं रियाने म्हटलं आहे. रियाने सीबीआयकडे तपास देण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रियाने पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेला एफआयआर मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. या मागणीला बिहार सरकारने विरोध दर्शवला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात पोलीस तक्रार केली असून तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुशांतची आर्थिक फसवणूक कऱण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Protected Content