बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधन आघाडीवर

पाटणा वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून यात पहिल्या टप्प्यात राजद-काँग्रेसच्या महागठबंधनने आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

बिहारमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक झाली. यात भाजप, जेडीयू आणि मित्रपक्षांची एनडीए आणि राजद, काँग्रेस व मित्रपक्षांचे महागठबंधन यांच्यात प्रचंड चुरशीची लढत झाली. पहिल्यांदा ही लढत अगदीच एकतर्फी होणार असल्याचे वाटत होते. मात्र शेवटच्या टप्प्यात महागठबंधनने जोरदार आगेकूच केली आहे. निवडणुकीनंतरच्या बहुतांश एक्झीट पोलमध्ये हीच महाआघाडी सत्तेवर येणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यात विशेष करून तेजस्वी यादव यांच्या झंझावाती सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असून याचमुळे ही आघाडी जिंकण्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, पहिल्यांदा पोस्टल मतमोजणी सुरू करण्यात आली असून यात महागठबंधन हे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. ताज्या कलाचा विचार घेतला असता महागठबंधन हे ६० जागांवर आघाडीवर असून एनडीएला मात्र ३४ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. हाच कल कायम राहिल्यास बिहारमध्ये महागठबंधन हे निर्णायक बहुमत मिळवू शकते. अर्थात, प्रत्यक्ष मतमोजणीत येत्या काही तासांमध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे.

Protected Content