जळगाव प्रतिनिधी । भारताच्या पहिल्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तो दिवस संपूर्ण भारतभर बालिका दिन साजरा करण्यात येतो. अनुषंगाने गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन साजरा करण्यात आला.
महिला सशक्तीकरणासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे एवढेच नाही तर स्त्री शिक्षणासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे, अशा शब्दात मुख्याध्यापीका रेखा पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थिनींनी पर्यावरण बाचावचा संदेश देत कागदी गुलाबपुष्प तयार केले व त्यांचा वापर करून बालिकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी योगेश भालेराव, स्वाती पाटील, योगिता फेगडे ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.