प्रहार जनशक्तीतर्फे जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील प्रहार जनशक्ती संघटनेमार्फत प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून लष्करात सेवा व्रत असणार्‍या जवानांच्या माता-पित्यांचा सन्मान करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्याचा स्तुत्य उपक्रम करण्यात आला.

तालुक्यातील गणेशपुर पिंपरी येथील २० लष्करी जवानांच्या माता-पित्यांना प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल धर्माजी जाधव यांचेमार्फत साड्या व शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरविण्यात आले. या माध्यमातून देश सीमेवर आपले संरक्षण करण्यासाठी सेवा बजावत असलेल्या जवानांप्रती तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती आदर भावना निर्माण करून त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाने या जवानांच्या कुटुंबीयांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले. यावेळी दिनेश रवींद्र घोरपडे, प्रभाकर शेलार, राहुल पाटील, तुषार पाटील, संदीप मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमाचे परिसरातून स्वागत करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content