पिकविमाचे ऑनलाईन क्लेम न केल्यामुळे शेतकरी शासकीय लाभापासून वंचित!

पाचोरा, प्रतिनिधी| तालुक्यातील नांद्रासह इतर सात खेड्यातील शेतकरी वर्गांनी खरीप हंगामासाठी पिकविमा काढला. मात्र  ७२ तासात ऑनलाईन क्लेम न केल्यामुळे २२८ शेतकरी शासकीय लाभापासून वंचीत राहत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले आहे.

 

तालुक्यातील नांद्रा व इतर सात खेड्यातील शेतकरी वर्गांनी बँक ऑफ बडोदा येथे खरीप हंगामासाठी   शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा फसल योजना अंतर्गत भारतीय एक्सा कंपनीचा विमा काढला होता. यामध्ये केँद्र सरकार, राज्य सरकार व शेतकरी वर्ग यांचा एकञीत मिळून पिकविमा रक्कम भरुण वीमा काढण्यात येतो. यावर्षी अपेक्षा पेक्षा पावसाचा कहर हा अधिक असल्याने जुन पासून ते सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला. व  २७, २८ व २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टीमुळे १००  मी. मी. च्या पुढेच पाऊस झाला. यामुळे तालुक्यात सरसकट अतिवृष्टी जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करा असे  सर्व पक्षाकडून मागणी करण्यात आली. यानिकाशावर राज्य सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी योग्य ती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश दिला. परंतु दरवर्षी प्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी सालाप्रमाणे आपल्या शेतात कृषी पिकविमा काढला आहे. त्यांना माञ ७२ तासाच्या मुदतीत ऑनलाईन क्लेम करण्याचे संबंधित विमा कंपन्यांनी नियम लागू करून शेतकरी वर्गावर अन्याय केला आहे. ज्या वेळेस मुसळधार पाऊस सुरू होता. त्यावेळी इंटरनेट नेटवर्क समस्या, विज समस्या, शिवार रस्ते पाण्याने तुडूंब भरलेले. याबरोबरच काही शेतकऱ्यांना आपला विमा आहे किंवा नाही हे माहित नसल्याने व क्लेम कसा करावा याबद्दल अज्ञान, मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेम अशा सर्व समस्या असूनही ज्या थोड्याफार शेतकऱ्यांनी ऑनलाइन क्लेम साठी कसातरी फॉर्म भरला. त्यांना आता त्यांच्या आलेल्या डॉकयार्ड नंबर नुसार कंपनीकडून अपडेड पाहिले तर त्यांचे आय. सी. क्लेम रिजेक्ट करुन व त्याचे कारण मध्ये लेट इंटीमेशन असे देण्यात  येऊन शेतकरी वर्गाचा क्लेम बाद ठरवण्यात येत असल्याचे त्या मोबाईल अॕप्सवर दिसत असल्याने पिकविमा शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी येथील पत्रकार प्रा. यशवंत पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रस्तुत प्रतिनीधी यांनी तालुका कृषी अधिकारी अशोक जाधव यांच्याशी फोनवरून वार्तालाप करुन याबाबत विचारणा केली. त्यावर तालुक्यात एकुण ६ हजार ८६५ शेतकरी वर्गांनी खरीप वीमा काढला आहे. व  याबाबत आपण अगोदरच विमा कंपनीचे जळगाव येथील प्रतिनिधी यांच्याशी बोललो आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे अगोदर ज्यांनी टप्प्याटप्प्याने  रोखीने विमा रक्कम भरली आहे. अशा शेतकरी वर्गाचा तदनंतर ज्या शेतकरी यांच्या कर्ज खात्यातून रक्कम वजा झाली. अशा शेतकरी वर्गाचा क्लेम व ज्यांनी ७२ तासात शक्य न झालेल्या शेतकरी वर्गाँचे मुदतीत आॕनलाईन क्लेम न सादर केल्याने त्यांचे आॕफलाईन माहिती दस्तावेज जमा करुन त्यांचा एकञीत डाटा विमा कंपनी यांनी आॕनलाईन सबमीट करून त्यांचा ही विचार नंतर क्लेम साठी करण्याचे सांगितले होते. परंतु  आॕनलाईन क्लेम करणारे तालुक्यात अंदाजे २० टक्केच शेतकरी आहेत असे सांगितले. मग प्रश्न येतो  ज्यांनी आॕनलाईन क्लेम केला नाही त्यांचे काय ? त्यांनी विमा फी भरली नव्हती का ? अतिवृष्टी जाहिर होऊन ही सरसकट वीमा लागू का नाही ?आॕनलाईन क्लेम भरतांना आलेल्या मोबाईल नेटवर्क समस्या ला जवाबदार कोण ? ज्या प्रमाणे तुम्ही ७२ तासातच आनलाईन क्लेम करण्याची अट टाकली आहे‌. तसीच तुम्ही शेतात जाऊन  व्हेरीफिकेशन करायला ही ७२ तासाचीच मुदत का नाही टाकली ? शेतकरी वर्ग दरवर्षी कृषी वीमा काढून गुन्हा करतात काय ? असे एक ना अनेक प्रश्न विमाधारक शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या   हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने अगोदरच हिरावला आहे. परंतु  इतकी अतिवृष्टी होऊन सुद्धा ही विमा कंपनी शेतकऱ्यांना देणारी तुटपूंजी  विमा भरपाईसाठी ही ते वेळेचे बंधन लावून शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई पासून वंचित ठेवत आहे.

यासंदर्भात नांद्रा ता. पाचोरा येथील विमा काढणारे शेतकरी बालू पाटील, अभिमान पाटील, समाधान पाटील, नाना पाटील, वरसाडे येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील अशा २२८ शेतकरी वर्गांनी पिकविमा काढला असून त्यामध्ये किती लाभार्थी पाञ ठरतात  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी वर्ग दरवर्षी  विमा काढत आहे. एकही वर्षी वीमा भरपाई त्यांना मिळाली नाही. यावर्षी अतिवृष्टी झाली तरी त्याला वीमा कंपनीने  वेळेचे बंधन लावून वेळ मारु पाहत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आपल्या पाणावलेल्या डोळ्यातून आम्हाला उचित भरपाई व न्याय मिळण्याची विनंती वजा अपेक्षा आमदार किशोर पाटील, खासदार उन्मेश पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीमा आधिकारी वर्ग यांच्याकडे केली आहे.

 

 

Protected Content