पाण्याच्या फवाऱ्याने कोरोनाला मारणार

 

नवी दिल्ली,  वृत्तसंस्था  । आतापर्यंत केवळ रशियाने करोनावरील लशीबाबत दावा केला आहे. मात्र रशियाचा हा दाव्यावर वादही आहे. अजूनही करोनावर कोणतेही विशिष्ट असे औषध आलेले नाही. मात्र, अशा परिस्थितीत एक चांगली बातमी देखील आली आहे. AIMMS-IIT मध्ये शिकलेल्या काही विद्यार्थ्यांनी एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्या द्वारे केवळ पाण्याच्या मदतीने करोना विषाणूला मारले जाऊ शकते.

डॉ. शशी रंजन आणि देव्यान साहा (IIT चे विद्यार्थी) सन २०१५ मध्ये अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन दिल्लीतील एम्समध्ये आले. तेथून त्यांना आपल्या देशासाठी आपली सेवा द्यायची होती. तेथे त्यांनी बायोडिझाईन इनोव्हेशनचा अभ्यास केला होता. गेल्या ५ वर्षांपासून ते एम्ससोबत काम करत होते.

नुकतेच त्यांनी करोना विषाणू मारण्यासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला ICMR ने मंजुरी दिली आहे. त्यांच्या या तंत्रज्ञानात केमिकल आणि रेडिएशन फ्री डिव्हाईसचा वापर करण्यात आला आहे. USFDA च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणारे हे भारतातील एकमेव तंत्रज्ञान आहे, हे विशेष.

या तंत्रज्ञानात पाण्याच्या सुपर मॅग्निफाय क्वॉलिटीचा वापर करण्यात आला आहे. ऑप्टिमाइझ कंडिशनमध्ये त्यामुळे पाणी अँटीव्हायरल बनते. या नंतर या अँटीव्हायरल पाण्याचा शिडकावा केला जातो. याचे मायक्रॉनएवढ्या आकाराचे तुषार (ड्रॉप्लेट्स) हवेत पसरतात. हे तुषार करोनासहीत इतरही विषाणूंचा खात्मा करतात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने जैविक दहशतवादावर देखील (Bio Terrorism) मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

त्यांच्याद्वारे तयार करण्यात आलेले हे डिव्हाइस पाण्यावर चालते. म्हणजेच, पाण्याचा वापराने हे विषाणू नाशक पाणी (अँटीव्हायरल पाणी) तयार होते. हे एक अतिशय स्वस्त मॉडेल आहे आणि पाण्याची कमतरता नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा जेवढा हवा तेवढा वापरला केला जाऊ शकतो,

Protected Content