यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्न होत नाही या नैराश्येतून तीन बहिणींचा एकुलता एक भावाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बळीराम अरूण पाटील (वय-३७) रा.दोणगाव ता.यावल असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बळीराम पाटील हा तरूण वृध्द आईवडीलांसह यावल तालुक्यातील दोनगाव येथे वास्तव्याला होता. रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचे वृध्द आई वडील घराबाहेर बसलेले असतांना आपल्या राहत्या घरातील मधल्या खोलीच्या छताच्या वरील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. लग्न होत नाही या नैराश्येतून तरूणाने गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. बळीराम हा अरूण पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केली. याबाबत विवेक धनराज पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान व पोलीस करीत आहे.