नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी ; गुलाबराव पाटील यांची टीका

जळगाव (प्रतिनिधी) नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

 

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पावरून केली होती. यावर आज गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते, असेही ना.पाटील म्हणाले.

Protected Content