नाना पटोले यांना प्रसिध्दीचा छंद : भारती पवार

नाशिक प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रसिध्दीचा छंद जडला असल्याची टीका केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आज केली आहे.

 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या  वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावरून भाजपच्याच नव्हे तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाष्य केले आहे. आता केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार  यांनी पटोलेंवर टीकेचे आसूड ओढलेत.
केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, राज्यात कॉंग्रेसची परिस्थिती अत्यंत खराब आहे. कॉंग्रेसला येत असलेल्या पराभवांमुळे पटोले यांना नैराश्य आले आहे. या नैराश्यातून ती अशी नाना वक्तव्ये करत आहेत. आता पराभवाच्या मानसिक धक्क्यातून सावरता  सावरता त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मोदी दिसायला लागले आहेत. मात्र, वैयक्तिक टीका करणे ही आपल्या राज्याची आणि देशाची संस्कृती नाही. पटोले यांना प्रसिद्धीच्या हव्यासाचा नवीन छंद जडला दिसतोय. त्यातून ते अशी वक्तव्ये करत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.

डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या की, राज्यातील प्रश्नांना समोर न जाता पळ काढण्यासाठी पटोले यांच्याकडून मोदींवर टीका केली जात आहे. मात्र, यातून नाना पटोले यांच्या बुद्धिमतेची दिवाळखोरी समोर आली आहे.   नाना पटोले यांना एक न्याय. पटोले यांना असे वक्तव्य करण्यासाठी परवाना काढणार्‍यांचे काय, म्हणत त्यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

 

Protected Content