नशिराबाद येथील पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा नगरपरिषदेवर “घागर मोर्चा”

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा नशिराबाद नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी यांना मंगळवारी ३० मे रोजी दुपारी २ वाजता निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नशिराबाद शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, शहराच्या आजूबाजूला असलेल्या पाणी श्रोतातून शहराची तहान भागेल इतक्या पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असतांना नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वाघूर धरणावरील बेळीगावात असलेली पाणीपुरवठा योजना, तसेच मुर्दापूर धरणा जवळील पाणीपुरवठा योजना आणि या भागात विहिरीवरून येत असलेले पाण्याचे स्रोत नशिराबाद गावातील नागरिकांना पाणी पुरवू शकतात. शिवाय शेळगाव येथून केलेली पाणीपुरवठा योजना निव्वळ विजेच्या थकबाकीपोटी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईवरून मोठे हाल सोसावे लागत आहे. नागरिकांना १२ दिवस पाण्याचे वाट पहावी लागत आहे. या सर्व परिस्थितीला नशिराबाद नगरपरिषद प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे शेळगाव येथील पाणीपुरवठा योजना सुरू करून नशिराबाद शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा येत्या ६ जून रोजी नशिराबाद नगरपरिषदेच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन, सय्यद बरकत अली सय्यद युसुफ अली, देवेंद्र पाटील, सादिक शहा बशीर शहा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content