नवीन संसद भवनाच्या उदघाटनावर राहूल गांधींची टिका !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज नवीन संसद भवनाचे उदघाटन झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी  यावर टिका केली आहे.

 

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तुचे लोकार्पण करण्यात आले आहे. यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधार्‍यांना टार्गेट केले आहे.  कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आहे.

 

संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे, असं म्हणत विरोधकांनी संयुक्त निवेदन जाहीर करून बहिष्कार जाहीर केला होता. यावरून सत्ताधार्‍यांनीही विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. तर, आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील उद्घाटन होताच ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

Protected Content