दिवाळी नंतर राज्यात आपलेच सरकार ! : विखे

कर्जत   थोडं थांबा दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार असल्याचा दावा भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमात केला आहे. 

 

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप सत्तारूढ होणार असल्याची चर्चा अनेकदा रंगत असते. काही भाजप नेत्यांनी याबाबत सूचक विधाने देखील केली आहेत. यात आता भाजपचे नगरचे खासदार सुजय विखे-पाटील यांची भर पडली आहे. सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील एका कार्यक्रमात बोलतांना थोडं थांबा. दिवाळीनंतर आपलंच सरकार येणार आहे, असा दावा त्यांनी केला. थेट आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात त्यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

यानंतर मात्र सुजय विखे-पाटील यांनी आपण कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी तसं विधान केलं, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. यापुढेही असं बोलत राहू असही ते म्हणाले.

Protected Content