दिल्लीकरांनो भारताच्या आत्म्याचे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद : प्रशांत किशोर

Prashant Kishor 1

 

दिल्ली (वृत्तसंस्था) धन्यवाद दिल्ली….भारताच्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी उभे राहिल्याबद्दल, असे ट्वीट करून प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीकरांचे आभार मानले आहे.

 

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून आम आदमी पक्षाने स्पष्ट आघाडी घेतली आहे. दिल्लीत पुन्हा एकदा आपचे सरकार येणार हे निश्चित आहे. दरम्यान दिल्लीच्या निकालावर ट्विट करत प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, धन्यवाद दिल्ली….भारताच्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी उभे राहिल्याबद्दल. दिल्लीत आम आदमी पक्ष स्पष्ट बहुमताने विजय मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. ७० जागांच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ५० हून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

Protected Content